Thursday 29 December, 2011

अंक ४७वा, २९ डिसेंबर २०११

अधोरेखित *
वेध पर्यटनाचा
पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. पर्यंटन संस्कृती आपल्या देशात आता चांगलीच रुजली आहे. त्यामुळे तसा पर्यटन हंगाम शालेय, महाविद्यालयीन परीक्षांचा काळ आणि भर पावसाळ्याचे महिने असा दोनेक महिन्यांचा कालावधी वगळता वर्षभरच सुरु असतो. पर्यटन सहली घडविणा-या संस्था आपल्या सहलीमध्ये नवनवे उपक्रम आणून या पर्यटन सहली संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करीत असतात. वेगवेगळ्या वयोगटांसाठी, वेगवेगळ्या व्यावसायीकांसाठी, धार्मिक स्थळांसाठी अशा खास सहली आयोजित करुन लोकांना आकृष्ट करीत असतात. राज्यांपुरत्या किवा देशापुरत्या पर्यटन सहली काढणा-या कंपन्यांनी आता परदेशातील सहलीमध्येही भरारी घेतली आहे. एकेकट्या कुटुंबाने पर्यटन स्थळांची सहल करण्याऐवजी अशा पर्यटन कंपन्यांच्या बरोबर सहलीला जाणे हे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आणि सोयीस्कर ठरते. बरेसचे सुरक्षितही ठरते. त्यामुळे यात्रा कंपन्यांबरोबर सहलीला जाणा-यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पर्यटन कंपन्यांना चांगला व्यवसाय मिळू लागला आहे. पर्यटनासाठी जाणा-यांची आवडनिवड वेगवेगळी असते.
देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकास, पर्यटनातून रोजगार याचा घोषा गेली बारा-पंधरा वर्षे लावला जातो आहे. या लेखात अधोरेखित केलेल्या अन्यत्रच्या विविध पर्यटन प्रकारांशी तुलना केली तर देशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपला जिल्हा कोठे आहे हे स्पष्ट होईल.
संपूर्ण कोकणपट्टीत रायगडपासून सिधुदुर्ग पर्यंत समुद्रकिनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतांची रांग यामध्ये कितीतरी धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सुंदर ठिकाणे आहेत. कोकणात, विशेषतः सिधुदुर्गातील देवस्थाने, गावरहाटीच्या विविध परंपरांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. येथील मंदिरांना गोवा किवा दक्षिण भारतातील मंदिरांप्रमाणे भव्यता नसेल पण पर्यटकांना खिळवून ठेवतील अशा आख्यायिका, परंपरा आहेत.
कोकणात ऐतिहासिक स्थळेही भरपूर आहेत. त्यातील रायगड सोडला तर अन्य किल्ल्यांची दूरवस्था आहे आणि सरकारची उदासिनताही आहे. शिवाजी महाराजांनी मालवणात एका बेटावर बांधलेला सिधुदुर्ग हा जलदुर्ग खूप महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर या किल्ल्यात आहे. या किल्ल्यामुळे मालवणला पर्यटनदृष्ट्या महत्व आले आहे. परंतु या किल्ल्याची ढासळती तटबंदी कायमस्वरुपी मजबूत करण्यात राज्य सरकारला स्वारस्य दिसत नाही. जंजिरा, विजयदुर्ग या अजूनही सुस्थितीत असलेल्या किल्ल्यांप्रमाणेच सिधुदुर्ग किल्ल्याकडेही पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केलेले आहे. मग बरीचसी पडझड झालेल्या कुलाबा, जयगड, रत्नागिरी, देवगड, रेडी तील यशवंतगड, सह्याद्रीतले हनुमंतगड अशा किल्ल्यांची काय कथा?
धर्मांधांना आवडत नाही म्हणून आपल्या गौरवशाली इतिहास दडपू पाहणा-या राजकर्त्यांकडून आपल्या वैभवशाली आणि शौर्याचा वारसा सांगणा-या ऐतिहासिक वास्तूंचे, गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करील अशी अपेक्षा कशी करायची?
निसर्गरम्य स्थळे हा पर्यटनाचा आनंद देणारा भाग. कोकणातील समुद्रकिनारपट्टी ही बरीचशी कडेकपारींनी भरलेली आहे. लांबलचक वालुकामय किनारपट्ट्या आहेतच, परंतु डोंगर कड्यावरुन दिसणारे समुद्राचे, समुद्राला येऊन मिळणा-या नदी-खाड्यांचे दर्शन विलोभनीयच असते. अशा कड्यावरुन सूर्यास्ताचे, समुद्राच्या पाण्यात बुडणा-या मोठ्या सूर्यबिबाचे दर्शन तर अवर्णनीय. मावळतीला जाणारा सूर्य समुद्राच्या पुळणीवर लाटांशी खेळणा-यांना आपापल्या राहुटीत (रिसॉर्ट) परतायची सूचना देतो. खाड्यांमध्ये होडीतून सैर करणे समुद्रापेक्षा सुरक्षित. आता तर त्या पाण्यामध्येच राहणा-या हाऊसबोट पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. यामध्ये आता पंचतारांकित सोयी असलेल्या हाऊसबोटीही कोकणातल्या खाडीमध्ये येऊ घातल्या आहेत.
अशा सागरी पर्यटनासाठी मुख्य रस्त्यापासून पर्यटनस्थळी जाण्याकरिता चांगल्या रस्त्यांची मात्र कोकणात वानवाच आहे. मच्छिमारी बंदरांच्या ठिकाणी जाण्यापुरते डांबरी रस्ते आहेत तेवढेच. पण त्यांचीही बव्हंशी दूरवस्थाच आहे. चांगले रुंद रस्ते किनारपट्टीलगतच्या पर्यटनस्थळांपर्यंत होणे, त्या रस्त्यांवर आणि पर्यटनस्थळी विजेचे दिवे लागणे, पाण्याची सोय असलेली स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे या गोष्टींकडे यापूर्वी सोडाच पण गेल्या दहा-बारा वर्षांतही कोणी लक्ष दिले नाही. ना लोकप्रतिनिधींनी, ना सरकारने, ना स्थानिक रहिवाशांनी. यामध्ये स्थानिक जमिन मालक हाही एक घटक आहेच! पण त्यावरही सरकारी हस्तक्षेपाने मार्ग काढता येणारा असतो. पर्यटक मोठ्या संख्येने आले की त्यांना आवश्यक चहापान, जेवणखाण व अन्य सोयी देण्याचा सेवा व्यवसाय आलाच. दोन-चार चांगली दुकानेही तेथे चांगली चालतील. कोकण किनारपट्टीवर राहणारे ९० टक्के लोक मच्छिमारी व्यवसायातले असतात. त्यातील काही कुटुंबांना पर्यटक सेवेचा स्वयंरोजगार उभारता येईल. स्थानिकांनी हे केले नाही तर दुसरे कोणीतरी परप्रांतीय येथे येऊन ते करणारच आहेत आणि आम्ही फक्त पहात राहणार आहोत. सिधुदुर्गातच नव्हे तर राज्याच्या अन्य भागातही केरळी, राजस्थानी लोकांनी आपापले व्यवसाय सुरु करुन जम बसविला आहे. त्यातले काही व्यवसाय पर्यटनाशी निगडीत आहेत. पर्यटनप्रवण असलेल्या आपल्याकडील गावात स्थानिक लोकांना तसे व्यवसाय करता येणे शक्य आहे. परंतू दूरदृष्टीचा अभाव, शारिरीक श्रम करण्याची तयारी नसणे यामुळे ते काहीच कामधंदा न करता घरी पेजभात मिळते म्हणून आळसावून बसलेले असतात.
अशा लोकांना कामासाठी उद्युक्त करण्याचे कार्य कुठल्याही कन्सल्टन्सीच्या आवाक्यातले नाही. टाटा कन्सल्टन्सीने लाखो रुपये फी घेऊन सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा आराखडा तयार केला. पण सिधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना पर्यटन व्यवसायात सामावून घेण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा उहापोह नाही. ते काम विविध सामाजिक संस्थांनीच केले पाहिजे. नव्हे तसे काम उभे करुन या तरुणांमधील नैराश्य, आळस, झटकून काढण्याचे काम केले पाहिजे.
- श्रीधर मराठे

संपादकीय *
सरकारी पर्यटन १५ वर्षानंतरही जैसे थे
सिधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला ‘पर्यटन जिल्हा‘ म्हणून जाहीर झाल्याला १५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षात सर्वत्र उत्तम रस्ते, बारमाही भरपूर पाणी पुरवठा, स्व-निर्मित वीज आणि या विजेचा २४ तास पुरवठा, अजूनही काही प्रमाणात संरक्षित असलेल्या मोठ्या देवरायांमध्ये पक्षी, प्राणी यांच्यासाठी अभयारण्ये, नियमित आणि वक्तशीर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे इत्यादी सरकारी निधीतून होणारी कामे पूर्ण होणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र व राज्यसरकारने निधीही दिलेला होता. त्यातील बराचसा खर्चही पडला आहे. सरकारी वरिष्ठ अधिका-यांची उदासीनता, दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यांतून मार्गी लागलेली ही कामे निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट स्वरुपाची झालेली आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर पर्यटकांच्या स्वागताच्या कमानी उभारणे तेथे त्यांना विश्रांतीसाठी हॉटेल तसेच स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करुन देणे. यासाठी निधी मंजूर झाला. परंतू एकाही सीमेवर काही काम झालेले नाही. मग प्रत्यक्ष जिल्ह्यात काही कामे पूर्ण होण्याची बातच सोडा.
अलिकडेच मिळालेल्या माहितीनुसार सिधुदुर्ग जिल्ह्यातील ‘क‘ वर्ग पर्यटन स्थळांच्या वर्गवारीचा शासन निर्णयच झालेला नसल्याने जिल्हाधिका-यांनी पर्यटन विकासासाठी आलेले प्रस्ताव मंजूर न करण्याचा निर्णय घेऊन पुढील सर्व कामे रोखली आहेत. या प्रस्तावांसाठी सुमारे साडेपाच कोटीचा निधी लागणार आहे. तो प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे अखर्चित राहून परत जाणार. या बाबतीत विचारणा झाली असता पाठविलेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळताच सदरील कामे त्वरित हाती घेऊन पूर्ण केली जातील असा खुलासा जिल्हाधिका-यांनी केला आहे.
आता केंद्र सरकारकडून सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी दीडशे कोटी रुपये मिळणार असल्याची माहितीही जिल्ह्याधिका-यांनी दिली आहे. त्याबाबत पर्यटन समितीने पाहणी करुन जिल्ह्यातील काही ठिकाणे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात या जर - तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात ही कामे केव्हा सुरु होऊन पूर्ण होतात हे महत्त्वाचे.
शासन निर्णय नसतांनाही जो निधी खर्चही झाला आहे. त्यातून ‘क‘ वर्ग पर्यटन यात्रास्थळ विकास म्हणून काही रस्ते, ओरोस येथील रवळनाथ मंदिर परिसराचे सुशोभिकरण, बालोद्यान, पथदिवे, वाहतुक, आंगणेवाडी, कुणकेश्वर येथे काही कामे झाली. त्यावेळी वर्गवारीचा नियम आड आला नाही. ही पद्धती चुकीची असल्याचे विद्यमान जिल्हाधिका-यांनी मान्य करुन यातील दोषी अधिका-यांवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. अर्थात अशी चौकशी होणेही आवश्यक आहे. कारण या विषयाशी संबंधीत अधिका-यांनी मंजूर होऊन खर्ची पाडलेल्या निधीमध्ये मोठाच ‘घपला‘ केला असणार यात शंका नाही. यामध्ये जिल्हा नियोजन अधिका-याचा हात असावा. आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकरणी वादग्रस्त ठरलेले यापूर्वीचे नियोजन अधिकारी मंजूर निधीवर कसा हात मारीत होते. याची अनेक उदाहरणे त्या त्या कामांशी संबंधित लोक सांगू शकतील. अर्थात कोट्यावधी रुपयांच्या या निधीमध्ये त्यांचे शासकीय आणि अशासकीय भागीदार असणारच!
पर्यटन विकासासाठी सरकारने पायाभूत सोयी उपलब्ध करुन द्याव्यात इतकीच मागणी होती व आहे. बाकीचे काम खाजगी उद्योजकांचे. निवासी हॉटेल्स बांधणे तेथे चांगल्या दर्जाची उपहारगृहे करणे, पर्यटकांना यात्रा स्थळांचे दर्शन घडविणे, त्यासाठी वाहन व्यवस्था, समुद्रसफरीसाठी छोट्या बोटी सुरु करणे. अशा अनेक व्यावसायीक गोष्टी उद्योजक करु शकतात. त्याप्रमाणे ब-याच ठिकाणी हॉटेल्स, स्थळदर्शन सुविधा सुरुही झाली आहे. ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन व लोकवर्गणी जमवून आपापल्या गावांतील भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार, सुशोभिकरण केले आहे. तेथे भक्तनिवासही उभारले आहेत. अनेक मठ मंदिरांमध्ये दुपारच्यावेळी अत्यंत अल्प दरात चांगले जेवण प्रसाद म्हणून दिले जाते. या सर्व गोष्टींचा लाभ देवदर्शनासाठी येणारे पर्यटक घेत असतात. हे सर्व सरकारी निधीतून झालेले नाही. पण या लोकांची अपेक्षा एवढीच की त्या त्या पर्यटनस्थळापर्यंत, मंदिरांपर्यंत जाणारे रस्ते चांगले प्रशस्त आणि खड्यविना असावेत. सरकारी योजनांतून पुरेसा पाणी पुरवठा बारमाही व्हावा. जिल्ह्यातील बहुतेक सर्व मोठ्या मंदिरांलगत पाण्याचे तलाव असतात. त्याकडे सरकारचे आणि स्थानिक ग्रामस्थांचेही अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. या तळ्यांमधील गाळ काढून पाणी साठा वाढविणे आणि सुशोभिकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता तळ्यातील गाळ, माती काढून नेण्याचे काम विनामोबदला करण्यास काहीजण तयार आहेत. (कौल कारखाने, वीट उद्योग, नर्सरी उद्योगांना ही माती उपयुक्त असते.) पण यातील असल्यास तर कायदेशीर त्रुटी दूर करुन तळ्यांचे पुनरुज्जीवन सरकारी पातळीवर होऊ शकणार आहे.
सिधुदुर्गसारख्या छोट्या आणि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी दुर्गम असलेल्या जिल्ह्यासाठी अपारंपारीक उर्जास्त्रोतांद्वारे चौवीस तास वीज पुरवठा सुरु करता येणे अवघड नाही असे अनेक तज्ञांचे मत आहे. मुळात या जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे निकषांपेक्षा कमीच वीज वापरली जाते. एक दोन छोटे जलविद्युत प्रकल्प, पवनउर्जा प्रकल्प या जिल्ह्यात उभारले तर छोटी - मोठी कारखानदारी आली तरीही हा जिल्हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण राहील. शिवाय असे प्रकल्प हे सुद्धा पर्यटन स्थळे बनतील.
पायलट मोटकरसायकल सेवा हवी
सिधुदुर्ग जिल्हा आकाराने छोटा असला तरी वाहतुकीची समस्या काही प्रमाणात आहेच, त्यासाठी गोव्याप्रमाणे पायलट मोटरसायकल सेवा विशेष बाब म्हणून या जिल्ह्यात सुरु करण्यास परिवहन खात्याने मंजूरी दिली तर शेकडो बेरोजगारांना हा नवा व्यवसाय मिळेल. पर्यटकांबरोबरच जिल्ह्यातील लोकांचीही चांगली सोय होईल. याबाबतीत पर्यटन खात्याने काही प्रस्ताव मांडला आहे की नाही ते समजले नाही. पण तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अशी पायलट सेवा सुरु करण्यासंबंधी परिवहन खात्याशी चर्चा झालेली आहे. तसा प्रस्तावही झाला असेल. तो मंजूर झाला तर सिधुदुर्ग जिल्ह्यातही तशी सेवा सुरु करता येईल. अन्य जिल्ह्यां कडूनही अशी मागणी होईल म्हणून हा प्रस्ताव शासन बाजूला ठेऊ पाहील. परंतू सिधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने विशेष बाब म्हणून राजकीय नेतृत्वाने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
कामाविषयी उदासीन आणि भ्रष्ट नोकरशाही, त्याहूनही उदासीन असणारे नागरीक यामुळे सरकारी योजनांवर पैसे खर्च होऊनही कामे कशी निकृष्ट होतात किवा कामे होतच नाहीत हे अनेक उदाहरणे देऊन सांगता येईल. या निष्क्रीय यंत्रणेला कामाला लावणारा खमका राजकीय नेता हवा. तो स्वतः किवा त्याचे निकटवर्तीय यांचा त्यामध्ये आर्थिक स्वार्थ असता नये तरच पर्यटन विकासातून जिल्हा विकासाचे हे स्वप्न वास्तवात येऊ शकेल.

विशेष *
सिधुदुर्ग ः पर्यटन जिल्हा लोकांचा पुढाकार
सिधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला ‘पर्यटन जिल्हा‘ म्हणून जाहीर झाल्याला १५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षात सर्वत्र उत्तम रस्ते, बारमाही भरपूर पाणी पुरवठा, स्व-निर्मित वीज आणि या विजेचा २४ तास पुरवठा, अजूनही काही प्रमाणात संरक्षित असलेल्या मोठ्या देवरायांमध्ये पक्षी, प्राणी यांच्यासाठी अभयारण्ये, नियमित आणि वक्तशीर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे इत्यादी सरकारी निधीतून होणारी कामे पूर्ण होणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र व राज्यसरकारने निधीही दिलेला होता. त्यातील बराचसा खर्चही पडला आहे. सरकारी वरिष्ठ अधिका-यांची उदासीनता, दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यांतून मार्गी लागलेली ही कामे निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट स्वरुपाची झालेली आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर पर्यटकांच्या स्वागताच्या कमानी उभारणे तेथे त्यांना विश्रांतीसाठी हॉटेल तसेच स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करुन देणे. यासाठी निधी मंजूर झाला. परंतू एकाही सीमेवर काही काम झालेले नाही. मग प्रत्यक्ष जिल्ह्यात काही कामे पूर्ण होण्याची बातच सोडा.
अलिकडेच मिळालेल्या माहितीनुसार सिधुदुर्ग जिल्ह्यातील ‘क‘ वर्ग पर्यटन स्थळांच्या वर्गवारीचा शासन निर्णयच झालेला नसल्याने जिल्हाधिका-यांनी पर्यटन विकासासाठी आलेले प्रस्ताव मंजूर न करण्याचा निर्णय घेऊन पुढील सर्व कामे रोखली आहेत. या प्रस्तावांसाठी सुमारे साडेपाच कोटीचा निधी लागणार आहे. तो प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे अखर्चित राहून परत जाणार. या बाबतीत विचारणा झाली असता पाठविलेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळताच सदरील कामे त्वरित हाती घेऊन पूर्ण केली जातील असा खुलासा जिल्हाधिका-यांनी केला आहे.
आता केंद्र सरकारकडून सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी दीडशे कोटी रुपये मिळणार असल्याची माहितीही जिल्ह्याधिका-यांनी दिली आहे. त्याबाबत पर्यटन समितीने पाहणी करुन जिल्ह्यातील काही ठिकाणे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात या जर - तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात ही कामे केव्हा सुरु होऊन पूर्ण होतात हे महत्त्वाचे.
शासन निर्णय नसतांनाही जो निधी खर्चही झाला आहे. त्यातून ‘क‘ वर्ग पर्यटन यात्रास्थळ विकास म्हणून काही रस्ते, ओरोस येथील रवळनाथ मंदिर परिसराचे सुशोभिकरण, बालोद्यान, पथदिवे, वाहतुक, आंगणेवाडी, कुणकेश्वर येथे काही कामे झाली. त्यावेळी वर्गवारीचा नियम आड आला नाही. ही पद्धती चुकीची असल्याचे विद्यमान जिल्हाधिका-यांनी मान्य करुन यातील दोषी अधिका-यांवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. अर्थात अशी चौकशी होणेही आवश्यक आहे. कारण या विषयाशी संबंधीत अधिका-यांनी मंजूर होऊन खर्ची पाडलेल्या निधीमध्ये मोठाच ‘घपला‘ केला असणार यात शंका नाही. यामध्ये जिल्हा नियोजन अधिका-याचा हात असावा. आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकरणी वादग्रस्त ठरलेले यापूर्वीचे नियोजन अधिकारी मंजूर निधीवर कसा हात मारीत होते. याची अनेक उदाहरणे त्या त्या कामांशी संबंधित लोक सांगू शकतील. अर्थात कोट्यावधी रुपयांच्या या निधीमध्ये त्यांचे शासकीय आणि अशासकीय भागीदार असणारच!
पर्यटन विकासासाठी सरकारने पायाभूत सोयी उपलब्ध करुन द्याव्यात इतकीच मागणी होती व आहे. बाकीचे काम खाजगी उद्योजकांचे. निवासी हॉटेल्स बांधणे तेथे चांगल्या दर्जाची उपहारगृहे करणे, पर्यटकांना यात्रा स्थळांचे दर्शन घडविणे, त्यासाठी वाहन व्यवस्था, समुद्रसफरीसाठी छोट्या बोटी सुरु करणे. अशा अनेक व्यावसायीक गोष्टी उद्योजक करु शकतात. त्याप्रमाणे ब-याच ठिकाणी हॉटेल्स, स्थळदर्शन सुविधा सुरुही झाली आहे. ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन व लोकवर्गणी जमवून आपापल्या गावांतील भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार, सुशोभिकरण केले आहे. तेथे भक्तनिवासही उभारले आहेत. अनेक मठ मंदिरांमध्ये दुपारच्यावेळी अत्यंत अल्प दरात चांगले जेवण प्रसाद म्हणून दिले जाते. या सर्व गोष्टींचा लाभ देवदर्शनासाठी येणारे पर्यटक घेत असतात. हे सर्व सरकारी निधीतून झालेले नाही. पण या लोकांची अपेक्षा एवढीच की त्या त्या पर्यटनस्थळापर्यंत, मंदिरांपर्यंत जाणारे रस्ते चांगले प्रशस्त आणि खड्यविना असावेत. सरकारी योजनांतून पुरेसा पाणी पुरवठा बारमाही व्हावा. जिल्ह्यातील बहुतेक सर्व मोठ्या मंदिरांलगत पाण्याचे तलाव असतात. त्याकडे सरकारचे आणि स्थानिक ग्रामस्थांचेही अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. या तळ्यांमधील गाळ काढून पाणी साठा वाढविणे आणि सुशोभिकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता तळ्यातील गाळ, माती काढून नेण्याचे काम विनामोबदला करण्यास काहीजण तयार आहेत. (कौल कारखाने, वीट उद्योग, नर्सरी उद्योगांना ही माती उपयुक्त असते.) पण यातील असल्यास तर कायदेशीर त्रुटी दूर करुन तळ्यांचे पुनरुज्जीवन सरकारी पातळीवर होऊ शकणार आहे.
सिधुदुर्गसारख्या छोट्या आणि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी दुर्गम असलेल्या जिल्ह्यासाठी अपारंपारीक उर्जास्त्रोतांद्वारे चौवीस तास वीज पुरवठा सुरु करता येणे अवघड नाही असे अनेक तज्ञांचे मत आहे. मुळात या जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे निकषांपेक्षा कमीच वीज वापरली जाते. एक दोन छोटे जलविद्युत प्रकल्प, पवनउर्जा प्रकल्प या जिल्ह्यात उभारले तर छोटी - मोठी कारखानदारी आली तरीही हा जिल्हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण राहील. शिवाय असे प्रकल्प हे सुद्धा पर्यटन स्थळे बनतील.
पायलट मोटकरसायकल सेवा हवी
सिधुदुर्ग जिल्हा आकाराने छोटा असला तरी वाहतुकीची समस्या काही प्रमाणात आहेच, त्यासाठी गोव्याप्रमाणे पायलट मोटरसायकल सेवा विशेष बाब म्हणून या जिल्ह्यात सुरु करण्यास परिवहन खात्याने मंजूरी दिली तर शेकडो बेरोजगारांना हा नवा व्यवसाय मिळेल. पर्यटकांबरोबरच जिल्ह्यातील लोकांचीही चांगली सोय होईल. याबाबतीत पर्यटन खात्याने काही प्रस्ताव मांडला आहे की नाही ते समजले नाही. पण तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अशी पायलट सेवा सुरु करण्यासंबंधी परिवहन खात्याशी चर्चा झालेली आहे. तसा प्रस्तावही झाला असेल. तो मंजूर झाला तर सिधुदुर्ग जिल्ह्यातही तशी सेवा सुरु करता येईल. अन्य जिल्ह्यां कडूनही अशी मागणी होईल म्हणून हा प्रस्ताव शासन बाजूला ठेऊ पाहील. परंतू सिधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने विशेष बाब म्हणून राजकीय नेतृत्वाने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
कामाविषयी उदासीन आणि भ्रष्ट नोकरशाही, त्याहूनही उदासीन असणारे नागरीक यामुळे सरकारी योजनांवर पैसे खर्च होऊनही कामे कशी निकृष्ट होतात किवा कामे होतच नाहीत हे अनेक उदाहरणे देऊन सांगता येईल. या निष्क्रीय यंत्रणेला कामाला लावणारा खमका राजकीय नेता हवा. तो स्वतः किवा त्याचे निकटवर्तीय यांचा त्यामध्ये आर्थिक स्वार्थ असता नये तरच पर्यटन विकासातून जिल्हा विकासाचे हे स्वप्न वास्तवात येऊ शकेल.
- जॉर्ज जोएल

डॉल्फिन डेस्टीनेशन
२००३ सालापासून निवतीचा समुद्र किनारा डॉल्फिन दिसण्याचा हॉटस्पॉट म्हणून विकसित झाला. सुरुवातीला निवती येथील श्रीधर मेथर आणि त्यांच्या सहका-यांना हे गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. इथला ९९ टक्के समाज मच्छिमारी व्यवसायात आहे. त्यामुळे पर्यटनाची मानसिकता रुजायला वेळ लागला. सोबत न बदलणारी सरकारी नियम, जाचक अटी यांची संगत होतीच. सर्वांवर मात करीत आज निवती गावात ५ ते ६ घरांमध्ये निवास-न्याहारीची सोय होवू शकते.
मेथरांच्या भाषेत हा वन-डे पिकनीक पॉईंट झाला आहे. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात हमखास सकाळच्या वेळी या भागात डॉल्फिनचे दर्शन होते. याचे मार्केटिग करुन निवतीकडे पर्यटकांना खेचण्यात यश आले. सकाळचे दोन तास डॉल्फिन दर्शन, त्यानंतर ३ ते ४ तास ‘वेंगुर्ले रॉक‘ला चक्कर, वाटेत बेटांवर दिसणारी स्विफ्ट पक्षांची घरटी हा साहसी पर्यटनाचा भाग सफर अविस्मरणीय बनवितो. संध्याकाळच्या वेळी मासेमारीचा प्रत्यक्ष अनुभव, रात्री माशांचे जेवण जेवून पर्यटक मजेत आपला दिवस घालवतात.
प्रस्थापित पर्यटनस्थळांपासून पूर्णपणे नव्या डेस्टिनेशनचा शोध घेणे, त्यासाठी सुरुवातीची मेहनत, प्रसिद्धी माध्यमांची मदत यामुळेच एखादे ठिकाण विकसित होत असते. गेल्या ७ वर्षात मासेमारीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून पर्यटनाकडे काही प्रमाणात पाहिले जात आहे. याला इतर स्थानिकांची मदत तर लागणारच आहे, पण सर्वात महत्वाची गरज आहे ती सरकारी परवानग्या मिळविण्याची.
नजिकच्या गोवा राज्यात कॅप्टन ऑफ पोर्ट खात्यांतर्गत पर्यटकांना समुद्रात फिरविण्यासाठी बोटींना विशेष परवाना मिळतो. ती प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. आपल्याकडे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड हे परवाने देते. सिधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन एक तप उलटले. तरी प्रत्यक्ष व्यवसाय दिसत असूनही मेथरांचे परवानगीचे प्रकरण गेली दहा वर्षे मेरीटाईम बोर्डाकडे प्रलंबित आहे. अथक परिश्रमांनी तारकर्ली-मालवण इथल्या बोटमालकांना टुरिस्ट बोटचा तात्पुरता परवाना मिळाला. गेली सात वर्षे सर्व सरकारी अधिकारी बोटीने निवती भागात फिरुन येतात. पण परवानगीचे प्रकरण अजुनही प्रलंबित आहे. तसेच अरुंद रस्ते, दिशादर्शक फलक नसणे यांवरही मार्ग निघणे आवश्यक आहे. मे २०११ मध्ये पर्यटन विकास महामंडळाचे मॅनेजिग डायरेक्टर श्री. कुरुंदकर यांनी पनवेल ते गोवा दरम्यान महत्वाच्या पर्यटनस्थळांकडे जाणारे दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने लावणार असल्याचे सांगितले होते. ७ महिने होत आले तरी दिशादर्शक फलकांचा पत्ता नाही. त्यामुळे सरकारी घोषणा, एम.टी.डी.सी.ची स्थानिकांप्रती अनास्था इथल्या लोकांना काही नवीन नाही.
केवळ अडचणी सांगणे हा शा.प.लो.पु. पुरवणीचा उद्देश नाही. श्रीधर मेथर आणि त्यांच्या सहका-यांनी अनेक अडचणींवर मात करत निवती गावाची सिधुदुर्गच्या पर्यटन नकाशात स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि निवतीचे नाव सर्वदूर पोचवले.
अगदी माफक दरामध्ये बोटिगची सुविधा निवतीमध्ये उपलब्ध आहे. रहाण्याची सोय देखिल काही घरांमध्ये केल्यामुळे सागरी पर्यटनाचा आनंद तिथल्या गावात जावून घेता येईल.
संफ ः श्रीधर मेथर, ९४२०८२१९९१.

वायंगणी समुद्र किना-यावर कासव जत्रेची शानदार सुरुवात
ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेला वेंगुर्ले-वायंगणी किनारा आता पर्यटकांसाठीही आकर्षण ठरतो आहे. किरात ट्रस्टच्या ‘कासव जत्रे‘च्या निमित्ताने वायंगणी गाव सहयोगातून पर्यटन नकाशावर आणण्याच्या प्रयत्नांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे औपचारीक उद्घाटन वायंगणी गावच्या सरपंच सौ. रसिका पंडीत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राणीमित्र सुहास तोरस्कर, अवधूत नाईक, प्रा. मर्गज, किरात ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. पेडणेकर गुरुजींनी मालवणी पद्धतीने पारंपारिक गा-हाणे घातले. वायंगणी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीतानंतर उपस्थित महिला पर्यटकांना आबोलीचे वळेसार देवून स्वागत करण्यात आले. या उपक्रमात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी येथील ६२ कुटुंबे नोंदणी करुन सहभागी झाली आहेत. ओळखीच्या कार्यक्रमात इथल्या घरांमधील आदरातिथ्याने आपण भारावून गेलो असल्याच्या भावना पर्यटकांनी व्यक्त केल्या.
कासव संवर्धनाचे काम करणा-या सुहास तोरसकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सरपंच सौ. रसिका पंडीत यांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. किरात ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर मराठे यांनी कासव जत्रा हा उपक्रम सुहास तोरसकरांनी चालविलेल्या कासव संरक्षण आणि संवर्धनाला पूरक ठरेल, पर्यटनाच्या माध्यमातून गावाची नवी ओळख पर्यटन नकाशावर येईल अशी जत्रेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सामाजिक कार्यकर्ते अवधूत नाईक, सरपंच रसिका पंडीत यांनीही उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन कार्यक्रमानंतर प्राणीतज्ञ प्रा. मर्गज यांच्या ‘टॉक शो‘ कार्यक्रमांतर्गत त्यांनी कासवांच्या जगभरातील प्रजाती, कासवांच्या सवयी, कासवांचे प्रजनन याविषयी माहिती सांगून उपस्थितांचे शंका निरसन केले. दुपारच्या सत्रात आरती कुलकर्णी यांची ‘गाज‘ ही प्राणीजिवनावरील फिल्म दाखविण्यात आली. नंतरच्या चर्चासत्रात पत्रकार कुमार कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन सातत्याने असे उपक्रम कोकणकिनारपट्टीवर झाले पाहिजेत असे सांगून पर्यटकांनी याची प्रसिद्धी स्वतःहून करुन या कार्याला हातभार लावावा असे आवाहन केले.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सावरीश्वर दशावतार मंडळाच्या ‘कासव अवतार‘ या नवीन बसविण्यात आलेल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्यात आला.
दुस-या दिवशीच्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार व दाभोली गावचे रहिवासी अरुण दाभोलकर यांनी आपल्या चित्रकलेचा अविष्कार उपस्थित पर्यटकांसमोर दाखविला. सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबेळकर यांनी ग्रामिण भागातील स्त्री जीवनावर गप्पांच्या स्वरुपात संवाद साधला. सुहास तोरसकर यांनी चित्रित केलेल्या, विनायक वारंग आणि समिर बागायतकर यांनी संकलीत केलेल्या फिल्मचा शो दाखविण्यात आला. समिर बागायतकर यांच्या साकारलेल्या मालवणी गीतांचा कार्यक्रमाने संध्याकाळ रंगतदार केली. सायली फाटक, सीमा मराठे, संतोष नांदोसकर यांनी सादर केलेल्या गीतांना निलेश पेडणेकर, प्रथमेश गुरव, मार्यान फर्नांडीस यांनी संगितसाथ केली.
पर्यटकांनी डॉल्फिन दर्शन, जंगल भ्रमंती, विविध चर्चासत्रे या सर्व कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेतला. वायंगणी गावातील स्थानिक महिलांनी सौ. मंगल खडपकर आणि त्यांच्या सहका-यांनी उत्कृष्ट मालवणी पद्धतीचे घरगुती जेवण व न्याहारी देऊन त्यांची वायंगणी ट्रीप ख-या अर्थाने संस्मरणीय बनवली. जत्रेच्या ठिकाणी कासावल्ली कासवाची जन्मकथा सांगणारा फलक, कोकणी मेव्याचे स्टॉल यांना जिल्ह्यातील पर्यटकांनीही भेटी दिल्या.
वायंगणीचे सुपूत्र मुंबईचे दीपक दीनानाथ नाईक यांनी पर्यटकांना समुद्र सफरीसाठी वापरावयाची लाईफ जॅकेटस् या कार्यक्रमासाठी देऊन सहकार्य केले. तसेच तोरसकर यांच्या निसर्गमित्र मंडळाचेही उत्तम सहकार्य लाभले. वायंगणी बागायतवाडीतील स्थानिक लोकांच्या सर्व सोयी असलेल्या घरांमध्ये पर्यटकांची निवास व्यवस्था करण्यात आली होती. वायंगणी येथील डॉ. मिनाक्षी किर्लोस्कर मेमोरिअल ट्रस्टचेही चांगले सहकार्य मिळाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ चंद्रकांत पेडणेकर, सुहास तोरसकर, दीपक व अवधूत नाईक, तसेच समिर बागायतकर व त्यांचे सहकारी जितेंद्र वजराटकर, विक्रांत आजगावकर, पंकज शिरसाट व किरात परिवाराने परिश्रम घेतले.

विशेष बातम्या *
विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण विसरु नयेत! - वेंगुर्ला हायस्कूल शतकमहोत्सव वर्ष कार्यक्रम
पैसा ही खरी संपत्ती नसून शिक्षण हिच खरी संपत्ती आहे. ही संपत्ती जो इतरांना वाटतो, त्यांना परमेश्वर अधिकाधिक देतो. म्हणूनच प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आपल्या शिक्षकांना कधीही विसरु शकत नाहीत. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन वेंगुर्ला हायस्कूल शतक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटक उद्योजक रघुवीर मंत्री यांनी केले.
वेंगुर्ला हायस्कूलचा शतक महोत्सवी कार्यक्रम २० डिसेंबर रोजी झाला. त्यावेळी कोल्हापूर चर्च कौन्सिलचे चिटणीस श्रीकांत पठाणे, माजी चिटणीस पी.बी.कांबळे, मुख्याध्यापक एस. बी.चोकाककर, पर्यवेक्षक आर.एस.तळसंदेकर, विद्यार्थी प्रतिनिधी अदिती वेंगुर्लेकर, नगरसेवक शैलेश गावडे,माजी विद्यार्थी सचिन वालावलकर, संजय पुनाळेकर, मुंबईहून गोविद उर्फ विजू गावडे, अॅड.शाम गोडकर आदी उपस्थित होते. यावेळी उद्घाटक रघुवीर मंत्री ५० हजार रुपयांची तर सचिन वालावलकर १० हजार रुपयांची देणगी दिली. संजय पुनाळेकर यांनी प्रवेशद्वार कमानीचे बांधकाम आणि विजू गावडे यांनी देणगी स्वरुपात प्रयोग शाळा बांधून दिली. यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रवेशद्वार कमानिचे उद्घाटन श्रीकांत पठाणे तर प्रयोगशाळेचे उद्घाटन रघुवीर मंत्री यांच्या हस्ते झाले. माजी मुख्याध्यापक एस. एस. काळे, जे. एम. सामंत, श्रीमती परब, सौ.एच.एच.मुल्ला, जे. आर. पुराणिक, सौ.वृंदा कांबळी, के.एच.शेख, डी.आर.माने, ठेकेदार श्री. काळे सर आदींचा माजी विद्यार्थी विजू गावडे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
शालेय विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण सोहळा झाला. श्री. पठाणे यांनी या शाळेत ११वी च १२वी ज्युनिअर कॉलेज सुरु करण्याचा मानस व्यक्त करुन माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी वेंगुर्ला हायस्कूल माजी विद्यार्थी मित्रमंडळ मुंबईचे सचिव प्रताप पवार, सदस्य सुभाष दिपनाईक हेही खास उपस्थित होते.

जागृती फेस्टीव्हल उत्साहात संपन्न
जागृती क्रीडा-सांस्कृतिक मंडळाने गेली २३ वर्षे सातत्याने विविध स्पर्धा, कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबवून जिल्ह्यात आदर्श मंडळ म्हणून नावलौकि मिळविला ही वेंगुर्लेच्या दृष्टीने गौरवास्पद बाब असल्याचे नगराध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांनी जागृती फेस्टीव्हलच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
यावेळी सातेरी व्यायामशाळेचे संस्थापक व प्रशिक्षक किशोर सोन्सुरकर यांना जागृती गौरव पुरस्कार रत्नागिरी पं. स. गटविकास अधिकारी सुनिल रेडकर यांच्या हस्ते तर आदर्श बालवाडी पुरस्कार सौ. कांचन दामले यांना गटशिक्षणाधिकारी सौ. वंदना वळवी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हा युथ संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास गावडे, राष्ट्रवादीचे सचिन वालावलकर, जागृतीचे अध्यक्ष संजय मालवणकर, अमोल सावंत, प्रशांत मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
फेस्टीव्हल निमित्त विविध स्पर्धेतील विजेते - वेशभूषा स्पर्धा - ४ गटात ५५ मुलांचा सहभाग होता. बालवाडी - १) भैरवी म. घाडी (शि.प्रा.अंगणवाडी), २)प्रसन्न प्र. नाईक (ज्ञानदा शिशु वेतोरे), ३) तन्वी श. परब (शिवाजी प्रा. अं.), उत्तेजनार्थ -हितेश येरम (दाभोली), श्रावणी न. गाडगीळ (ज्ञानदा वेतोरे), १ली ते २री - १)निर्जरा सं.पाटील (शाळा क्र.४),२)दिक्षा द.कामत (इं.मि. स्कूल),३)सिद्धी उ.परब (भटवाडी नं.१), उत्ते.-आदित्यराज शि. सावंत, सुयोग चा.जोशी, ३री ते ४थी - १) धीरज घाडी (शिवाजी प्राग.), २)प्रयाग मि. दामले (वेतोरे क्र.१), ३) पूर्वा चा.जोशी (भटवाडी नं.२), उत्ते.-मैथिली कि. सोनसुरकर, प्रबल अ. बिराजदार, ५वी ते ९वी - १) प्रणाली प्र. सातार्डेकर (वेंगुर्ला हाय.), २) अक्षय सं. पाटील (वेंगुर्ला हाय.), ३) गौरेश सु. कावले (वेंगुर्ला नं.३), उत्ते. -शुभम श. परब, ओंकार जनार्दन कासले
चित्रकला स्पर्धा-बालवाडी-श्रावणी पेडणेकर (भटवाडी नं.१), हर्षदा गावडे, पवन कांबळे (शिवाजी प्राग.), भुषण सावंत (वेंगुर्ले नं. ३), हेमांगी कुडपकर(भटवाडी नं.१) १ली ते २री - निर्जरा पाटील (शाळा क्र. ४), सिद्धी परब (भटवाडी नं.१), पूर्वा करंगुटकर (वेंगुर्ले नं. १), अक्षता परब (परबवाडा नं.१), प्रथमेश भगत (कणकेवाडी नं.१) ३री ते ४थी - अमरेन सावंत (सिधुदुर्ग विद्या.), वैष्णवी वराडकर (भिवजीवाडी वेतोरे), प्रज्वल कोयंडे, धिरज घाडी (शिवाजी प्राग.),आदेश धुरी(भिवजीवाडी वेतोरे), ५वी ते ७वी-संस्कृती कांबळी (वेंगुर्ले हाय.), गोविद सावंत (परबवाडा नं.१), वैभव जाधव (वेंगुर्ले हाय.), अनुष्का शिरसाठ (वेंगुर्ले नं. ३), प्रेम चोडणकर (वेंगुर्ले हाय.), ८वी ते १०वी -लक्ष्मी करंगळे,मोहन नवार (वेंगुर्ला हाय.), शुभम मांजरेकर, सुमित मांजरेकर (उभादांडा हाय.), श्वेता गावडे (अणसूर पाल), कर्णबधीर गट-ओंकार कांबळी, अभिषेक पाटील, सर्वेश कांबळी (सर्व कर्णबधीर विद्यालय शिरोडा)
मॅरेथॉन स्पर्धा- १०वर्षाखालील मुले-संदीप पाटील (शिवाजी प्राग.), योगेश वराडकर (भिवजीवाडी वेतोरे), विशाल पवार (परबवाडा क्र.१), शुभम मालवणकर (रामघाट शाळा), सुकृत दामले (आडेली-खुटवळ), सुजल जाधव (शाळा क्र. ४), उत्कर्षा भोवर (परबवाडा क्र.१), ऐश्वर्या मालवणकर (सिधुदुर्ग विद्या.), सेजल जाधव (शाळा क्र.४), सुशिला कांबळी (वेंगुर्ले क्र.४), समिक्षा भोवर (परबवाडा क्र.४), १२ वर्षाखालील मुले-मयूरेश घाडी (शिवाजी प्राग.)युवराज नाईक (सिधुदुर्ग विद्या.), बाळकृष्ण परब (परबवाडा क्र.१), प्रबल बिराजदार (सिधुदुर्ग विद्या.), धीरज घाडी (शिवाजी प्राग.),मुली- प्रणाली कुबल,गंगा वालावलकर, उत्कर्षा जाधव, पूर्वा परब (वेंगुर्ले क्र.४), सानिका कांबळे, ईशा मालवणकर (दोन्ही वेंगुर्ले क्र.३), मुले - विशाल बागायतकर(उभादांडा क्र.१), जमेरुद्दीन खान (वेंगुर्ले क्र.१)
नृत्य स्पर्धा -लहान गट-१) तन्वी परब (शि.प्रा.अं.), २) श्रावणी पेडणेकर (भटवाडी नं.१,अं.),३) ऋतुजा गावडे (शिवाजी प्राग.), उत्ते. - हेमांगी सं. कुडपकर (भटवाडी नं.१.अं.) व श्रावणी गाडगीळ (ज्ञा.शि.वेतोरे),मोठा गट -१) प्रचिती मालवणकर (सिधुदुर्ग विद्या.), २)लक्ष्मी प्रभुखानोलकर (मदर तेरेसा स्कूल), ३) प्रार्थना मातोंडकर (सिधुदुर्ग विद्या.), उत्ते.- निर्जरा पाटील (वेंगुर्ले नं. ४) व सानिका कांबळे (वेंगुर्ले नं. ३)
ग्रुपडान्स स्पर्धा -लहान गट -१) शिवाजी प्रागतिक अंगणवाडी, २) ज्ञानदा शिशुवाटीका वेतोरे, ३) शेणई बालवाडी, उत्तेजनार्थ - वेंगुर्ले नं. ३ अंगणवाडी, मोठा गट - १) दाभोली शाळा नं. १, २) भिवजीवाडी शाळा वेतोरे, ३) श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे, उत्तेजनार्थ - दाभोली हायस्कूल व मोरया ग्रुप वेंगुर्ले
पाककला स्पर्धा-१)सौ.संध्या खांबकर, २) वैशाली वैद्य, ३) श्रद्धा गोरे, उत्तेजनार्थ-सौ. कविता भाटीया, सौ.मनाली पिगुळकर, परिक्षण-सौ.स्नेहांकिता साने, सौ.श्रद्धा बेलवलकर यांनी केले.
बक्षिस वितरण नगरसेवक प्रसन्ना कुबल, अभी वेंगुर्लेकर, महेश वेंगुर्लेकर, वामन कांबळे, सौ. सुषमा प्रभूखानोलकर, सौ. हेमा गावसकर, दादा आरोलकर यांच्या हस्ते झाले.

सुदेश आचरेकरांना तूर्त राजयोग
मालवणात काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणुक लढवून विजयी झालेले महेश जावकर यांनी आपल्या एका मतामुळे काँग्रेस पक्षाकडे नगराध्यक्ष पद जाऊ नये यासाठी राष्ट्रवादीची साथ करण्याचे ठरविले आणि राष्ट्रवादीचे ६ आणि शिवसेनेचे २ मिळून ८ नगरसेवकांनी जावकर यांनाच नगराध्यक्ष -पदी बसविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे सौ. कासवकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही भरला. काँग्रेसतर्फे सुदेश आचरेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
जावकरांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवितांना राष्ट्रवादीच्या कासवकर यांना जावकर यांनी प्रधिकृत केल्याचे पत्र नव्हते. त्यामुळे जावकरांचा अर्ज विभागीय आयुक्त व नंतर न्यायालयाने अपात्र ठरविला. त्यामुळे सुदेश आचरेकरना एक मत कमी असूनही मालवणच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळाली आहे.
राष्ट्रवादीतर्फे जावकरांचा अर्ज भरतांना केलेली घाई आणि गलथानपणा राष्ट्रवादीच्या अंगाशी आला. तरीही एका बहुमताच्या आधारे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महेश जावकर यांचीच निवड करुन राष्ट्रवादीने विषय समित्याही मित्रपक्षाच्या साथीने आपल्याकडे राखल्या.

No comments:

Post a Comment