Thursday 15 December, 2011

अंक ४५वा, १५ डिसबर २०११

अधोरेखित *
दहशतवादला झटका
उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपालिकांमध्ये भुईसपाट करुन त्यांच्या दहशतवादाला मतदारांनी लोकशाही मार्गाने जोरदार झटका दिला आहे. त्यामानाने मालवण नगरपरिषदेत त्यांना निसटते यश मिळाले असले तरी त्यासाठी त्यांना सत्तेकरीता अपक्षाला हाताशी धरावे लागणार आहे. राणे आणि त्यांच्या पुत्राने वेंगुर्ल्यात केलेल्या उद्योगांमुळे जनमत त्यांच्या पूर्ण विरोधात गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेवर पूर्वीपासून राष्ट्रवादीचेच वर्चस्व होते. आमदार दीपक केसरकर यांना शह देण्यासाठी राणे समर्थकांनी जंगजंग पछाडले. खुद्द मुख्यमंत्री काँग्रेसच्या प्रचाराला आले. परंतू सावंतवाडीत १०० टक्के, १७ पैकी १७ जागा जिकून राष्ट्रवादी पक्षाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले एवढेच नव्हे तर राणे समर्थक काँग्रेसच्या खोट्या प्रचाराचा बुरखाही फाडला आहे.
हीच गोष्ट वेंगुर्ल्यातही घडली. येथे राष्ट्रवादीला १२ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीबरोबर युती केलल्या भारतीय जनता पक्षाला २ जागा मिळाल्या. १ जागा मनसेला तर काँग्रेसपक्षाला एकमेव जागा मिळविता आली. राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून बंडखोरी केलेले रमण वायंगणकर हे मूळचे राष्ट्रवादीचेच उमेदवार विजयी झाले आहेत. वेंगुर्ल्यात यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती ती केवळ अडीच वर्षापुरती. यापूर्वी ४ राष्ट्रवादी, २ सेना, २ भाजप आणि १ अपक्ष अशा ९ जणांच्या गटाचे बहुमत झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या सौ. नम्रता कुबल यांची नगराध्यक्ष झाल्या. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यावर पुन्हा पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष निवडतांना चारच जागा मिळालेल्या काँग्रेसला ४ अपक्ष आणि आधीच्या सत्ताधारी गटातील एका अपक्षाच्या साथीने ९ जणांचे बहुमत करुन अडीच वर्षाचे नगराध्यक्षपद मिळाले होते.
सिधुदुर्ग जिल्ह्यात तीन्ही नगरपालिकांवर काँग्रेस पूर्ण बहुमतात येईल असे ठामपणे सांगणा-या राणे समर्थकांचा मुखभंग झाला आहे. विकासाच्या खोट्या गोष्टी सांगणा-या राणे आणि त्यांच्या समर्थकांनी वेंगुर्ल्यात ५ डिसेंबरला जो काही राडा केला तो शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच केल्याचे जाहीर सभेतून सांगून खोट्या प्रकाराची त्यांनी कमालच केली होती. परंतू वेंगुर्ल्यातील सूज्ञ मतदारांनी राणेंच्या विरोधात कौल देऊन आपली कमाल दाखविली आहे. त्याचबरोबर राणे ज्या शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. त्या शिवसेनेच्या जशास तसे उत्तर देण्याच्या भाषेलाही मतदानातून विरोधी कौल देत राडा संस्कृतीला वेंगुर्ल्यात स्थान नाही हे दाखवून दिले आहे. वेंगुर्ले व सावंतवाडीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
मालवणात केवळ २ जागा मिळाल्या. ६ जागा जिकणा-या राष्ट्रवादीला राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या एका अपक्षाला साथीला घेऊन मालवण नगरपरिषदेवर सत्ता हाती घेता येईल.
येत्या दोन महिन्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर पुन्हा बहुमत राखण्यासाठी राणे आणि त्यांचे समर्थक आटोकाट प्रयत्न करतील यात शंका नाही. परंतु जिल्ह्यातील तीन नगरपालिकांवर वर्चस्व मिळविण्यासाठी राणे समर्थकांनी साम, दाम, दंड, भेद ही निती वापरुन आणि पैशांचा भरपूर वापर करुनही या पक्षाला दोन नगरपरिषदांत केवळ एक जागा आणि मालवणात आठच जागा जिकता आल्या. हेच चित्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही उमटले तर काँग्रेस पक्षात शिवसेनेतून आलेल्या राणे समर्थक काँग्रेस गटाची सद्दी संपली असे म्हणता येईल. शहरी मतदारांनी ज्या निर्भयपणे आणि सूज्ञपणे मतदान करुन राणे समर्थकांना सत्ताभ्रष्ट केले ती किमया जिल्ह्यातील ग्रामिण मतदार करील काय?

सिधुदुर्ग जिल्ह्यातील ३ नगरपरिषदांच्या निवडणुकीत ५१ जागांपैकी राष्ट्रीय काँग्रेसला फक्त ९ जागा मिळविता आल्या. राष्ट्रवादीने ३५ जागा मिळवून बाजी मारली. भाजपला २, शिवसेनेला २, मनसेला १ जागा मिळाल्या. २ बंडखोर अपक्ष निवडून आले. सावंतवाडी नगरपरिषदेत १७ पैकी १७ जागा राष्ट्रवादीला, वेंगुर्ल्यात १२ राष्ट्रवादी, २ भाजप, १ मनसे, १ काँग्रेस, १ अपक्ष तर मालवणात ८ काँग्रेस, ६ राष्ट्रवादी, २ सेना, १ अपक्ष विजयी झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात नारायण राणे समर्थकांचा प्रभाव पूर्वीही नव्हता. तिथे रत्नागिरी शहरात २८ जागांपैकी सेना- १३, भाजप- ८ मिळून युतीने २१ जागा मिळविल्या. राष्ट्रवादीला ६ व काँग्रेसला १ जागा मिळाली. चिपळुणात २४ पैकी राष्ट्रवादी-१३, काँग्रेस-२ आघाडीला १५ जागा मिळाल्या. शिवसेनेने ४ तर शहर विकास आघाडीला ५ जागा मिळाल्या. खेडमध्ये १७ पैकी ९ जागा मिळवून मनसेने प्रथमच बहुमत मिळविले. शिवसेनेला ७ तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. दापोलीत १७ पैकी शिवसेना-४, भाजप-२, आर.पी.आय. १ या युतीला ७, राष्ट्रवादी ६ व काँग्रेसला १ आणि मनसेला ३ जागा मिळाल्या. राजापूरात १७ पैकी काँग्रेस-१०, राष्ट्रवादी- २ आघाडीला १२, सेनेला ३ तर भाजपला २ जागा मिळाल्या.
श्रीधर मराठे



प्रासंगीक *
दहशतीने गाजली नगरपरिषद निवडणुक
एरवी कुठल्याही निवडणुकीच्या काळात आतापर्यंत शांततामय वातावरण असलेल्या आत्ताच्या नगरपरिषद निवडणुकीत बाहेरुन आलेल्या नारायण राणे समर्थकांनी सोमवारी ५ डिसेंबरच्या रात्री घातलेल्या हिसक हैदोसामुळे वातावरण अत्यंत तणावपूर्ण आणि भितीदायक बनले होते.
निमित्त झाले जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वेंगुर्ल्यातील उद्योजक विलास गावडे यांच्या घरी जाऊन नारायण राणेंचा मुलगा नितेश आणि त्यांच्या समवेत असलेल्यांनी केलेल्या दहशती कृत्याचे. विलास गावडे घरी नसतांना झालेल्या या प्रकाराचे वृत्त सगळीकडे समजताच गावडेवाडी, दाभोसमधील शेकडो लोकांनी धाव घेतली व दाभोली नाका येथील काँग्रेस कार्यालयात नितेश राणे अन्य कार्यकर्त्यांसमवेत बसलेले असतांना घेराव घातला. नितेश राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जमाव वाढत गेला. पोलीस पथक, तहसिलदार वैशाली पाटील वगैरे तेथे हजर झाले. जमावाची एकच मागणी होती. नितेश राणेंना बाहेर काढा. सुमारे तीन तास शांततेने चाललेल्या या घेराव नाट्याला पालकमंत्री नारायण राणे, खासदार निलेश राणे पुढे पोलीस व मागे तीस-चाळीस गाड्यांतून बाहेरचे कार्यकर्ते घेऊन आल्यावर हिसक वळण मिळाले. लाठ्या, शिगा, चाकू, तलवारी अशा शस्त्रांनिशी आलेल्या राणेंच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जमलेल्या निरपराध जमावावर हल्ला चढविला. अनेकांना मारहाण करुन जखमी केले. नंतर रस्त्यातील दुचाकी, चारचाकी वाहनांवर लाठीचार्ज करुन मोडतोड केली. यातून पोलीस व निवडणुक विभागाच्या गाड्याही सुटल्या नाहीत. तेथून सुंदर भाटले येथील शिवसेनेच्या कार्यालयावरही हल्ला चढविला. आमदार परशुराम उपरकर तेथे बसलेले होते. त्यांच्या अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबलने शटर खाली ओढताच सशस्त्र गुंडांनी ते जबरदस्तीने उघडून कार्यालयातील वस्तूंची नासधूस केली. दरम्याने अंगरक्षकाने स्व-संरक्षणार्थ गोळीबार करताच हल्लेखोर पळाले. नंतरही बाहेरुन आलेल्या राणे समर्थकांनी चौरस्त्यावर दहशत निर्माण केली. रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी दुचाकी वाहनांचा काचा फोडून, लोखंडी शिगा, काठ्यांनी नासधुस केली. जमावातील ब-याच लोकांना मार बसला. काहीजण जखमी झाले. बरेच लोक घाबरुन पळून गेल्यामुळे बचावले. पालकमंत्र्यांना घाबरुन असलेल्या पोलिसांनी मात्र एवढा सगळा प्रकार होऊनही निष्क्रीयता दाखविली. सुमारे तासभर हैदोस घातल्यावर राणे समर्थक कणकवलीकडे निघून गेले.
घटनेच्या रात्रीच दूरदर्शनवरील बातम्यांमधून सर्वत्र हा प्रकार समजला. खुद्द नारायण राणे आणि त्यांच्या निकटच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियांचा खोटेपणाही घडलेला प्रकार प्रत्यक्ष पाहणा-यांच्या लक्षात आला आणि लोकांमधील असंतोष आणखी वाढला. दुस-या दिवशी मंगळवारी राणे समर्थकांच्या या कृत्यांमुळे संतप्त झालेल्या व्यापारी व्यावसायीकांनी वेंगुर्ले बंद शंभर टक्के यशस्वी केला. कोणीही लोकांना बंदचे आवाहन केले नसतांना संपूर्ण बाजारपेठ मार्केट, रिक्षा व अन्य व्यावसायिकांनी संपूर्ण दिवस आपले व्यवहार बंद ठेऊन कडकडीत हरताळ पाळून निषेध व्यक्त केला.
बुधवारी सायंकाळी नारायण राणे यांनी माणिक चौकात जाहीर सभा घेऊन आपले कार्यकर्ते निर्दोष असल्याचे सांगत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच बाटल्या, दगडफेक करुन नासधूस केल्याचे सांगितले. या सभेतही काँग्रेस पक्षाचे उमेदवार, त्यांचे मोजकेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ४० ते ५० गाड्यांतून बाहेरुन आणलेले तथाकथित कार्यकर्ते हजर होते.
त्यानंतर गुरुवारी सायंकाळी साई मंगल कार्यालयात तालुक्यातील काँग्रेस सोडून सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी नागरीक यांची मोठी सभा होऊन राणे समर्थक काँग्रेस उमेदवार सोडून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मत द्या असे आवाहन सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले. शांत, सुसंस्कृत वेंगुर्ले शहराला राणे समर्थकांनी दहशती कृत्ये करुन काळिमा फासल्याचे वक्त्यांनी सांगितले. आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, आपली राज्यातील आघाडी काँग्रेस पक्षाशी आहे. राणे समर्थकांच्या काँग्रेसशी नाही.
या सभेत शिवसेना आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार श्रीकांत सरमळकर, भारतीय जनता पक्षाचे दोडामार्गचे माजी सभापती म्हापसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक, आर.पी.आय.चे मिलिद वेंगुर्लेकर, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रा. पां. जोशी, लायनेस क्लबच्या अध्यक्षा सौ.स्मीता डुबळे, भ्रष्टाचार निर्मूलन न्यासाचे अतुल हुले, तालुका भाजपा अध्यक्ष साईप्रसाद नाईक, शिवसेनेचे नेते व उद्योजक पुष्कराज कोले, डॉक्टर्स फॅर्टनिटी क्लबचे डॉ. मणचेकर, बार असोसिएशनचे अॅड. सूर्यकांत खानोलकर, अॅड. डी. ए. सामंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिपक नाईक आदींनी आपले परखड विचार मांडून जिल्ह्यातील हा दहशतवाद वेंगुर्ल्यातील नागरिकांनी मतपेटीद्वारे संपवावा असे आवाहन केले.
युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी वेंगुर्ले शहरात फिरुन राणे समर्थकांकडून दहशती कृत्ये होऊनही वेंगुर्ल्यातील लोकांनी संयम पाळला व सनदशीर मार्गाने वेंगुर्ले बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला याबद्दल आभार मानले व काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने ज्यांच्या वाहनांचे नुकसान झाले त्यांना तसेच जखमी झालेल्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
शुक्रवारी (ता.९) जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेची माणिक चौकात जंगी सभा झाली. विरोधी पक्षनेते रामदास कदम, श्रीकांत सरमळकर, आमदार परशुराम उपरकर, जिल्हा प्रमुख वैभव नाईक, एकनाथ नाडकर्णी आदींची भाषणे झाली.
सर्वच पक्षांनी वेंगुर्ले शहरातून प्रचार फेरी काढली. राष्ट्रवादीच्या फेरीत आमदार दीपक केसरकर यांच्यासह पदाधिकारी आणि निवडणुकीतील सर्व उमेदवार, कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या फेरीत माजी आमदार शंकर कांबळी, नारायण राणेंचे पुत्र स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व ज्यांच्यावर वेंगुर्ले निवडणुकीची जबाबदारी सोपविली होती ते नितेश राणे, जिल्ह्यातील व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, जि.प., पं.स.सदस्य आणि उमेदवार प्रचार फेरीत सहभागी झाले होते. शिवसेनेनेही प्रचार फेरी काढली. त्यामध्येही जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते यांचा सहभाग होता. भारतीय जनता पार्टीचे तीनच उमेदवार असल्याने त्यांचा भर घरोघरी जाऊन मतदारांना भेटणे यावर होता. या शिवाय मतदारांवर प्रचार पत्रकांचा, वृत्तपत्रांतून जाहिरातीद्वारे आवाहने, सर्वच पक्षांच्या पदाधिका-यांच्या दुस-यांची उणीदुणी काढणा-या मुलाखती, पालकमंत्री, आमदार यांच्या मुलाखती यांचा मारा वृत्तपत्रांद्वारे मतदारांवर करण्यात आला.
वेंगुर्ल्यात झालेल्या राणे समर्थकांच्या दहशती कृत्याबद्दल पोलिसांनी घेतलेली भूमिका आक्षेपार्ह होती. त्यानंतर मात्र निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. वेंगुर्ल्यात बाहेरुन आलेल्या आणि मतदार यादीत नाव नसलेल्या राणे समर्थकांना शोधून काढून परत पाठवावे असे आदेश होते. त्याची कितपत अंमलबजावणी झाली हे समजू शकले नाही. मात्र वेंगुर्ले शहराच्या सर्व हद्दीवर आणि शहरात नाक्यानाक्यावर स्थानिक पोलिस आणि राज्य राखीव दलाचे पोलिस यांचा बंदोबस्त होता. वाहनांची झडती घेतली जात होती. जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतांना आणि आचार संहीता असताना नारायण राणेच्या समवेत ३०-४० गाड्या भरुन बाहेरचे गुंड येतात कसे हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडलेला दिसून आला नाही. अन्यथा निवडणुक काळात महसूल प्रशासन आणि पोलिस खाते यांच्यावर निःपक्षपाती पणे कारभार करण्याची जबाबदारी असते ती त्यांनी योग्यप्रकारे पार पाडली नाही किबहूना त्यांना ती दबावामुळे पार पाडता आली नाही असे दिसून आले.
वेंगुर्ल्यात यापूर्वी निवडणुकीत कधीही असा प्रकार घडला नव्हता. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुक संपल्यावर आपापसात कोणतेही वैमनस्य न ठेवता वागत असत. आता मात्र राणे समर्थक आणि इतर अशी फुट पडली आहे. एकंदरीत ही निवडणुक विचार, विकास यापेक्षा आपापसातील वादविवादांनी गाजली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी सावंतवाडीत उतरले तेव्हा त्यांना दोनच दिवस आधी वेंगुर्ल्यात घडलेल्या हिसक प्रकाराची माहिती पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाकडून मिळाली नसेल असे म्हणता येणार नाही. खरोखरच तशी ती मिळाली नसेल तर ती पोलीस खात्याची बेपर्वाई आहे आणि मिळाली असेल तर ‘कुठे आहे दहशतवाद‘ असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे विचारणे हे तर अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सावंतवाडी आणि मालवणात प्रचार सभा घेतल्या त्यांनी वेंगुर्ल्यात येऊन राडा प्रकरणाची झाडाझडती घेणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनीही ते पार पाडले नाही. यावरुन लोकनियुक्त प्रशासन किती ‘ढिले‘ आहे हेच या निमित्ताने दिसून आले.

विशेष *
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुक २०११ - वॉर्ड निहाय निकाल
प्रभाग क्र. १
एकूण मतदार- २३५२,
झालेले मतदान - १५९९
अ- सर्वसाधारण, विजयी उमेदवार-
वेंगुर्लेकर अवधुत उर्फ महेश-राष्ट्रवादी- ८४३, कोयंडे चंद्रशेखर लक्ष्मण-शिवसेना * ४८९, गावडे नागेश मोहन-रा. काँग्रेस * १६५, फर्नांडीस सिप्रीयान तमास-मनसे * १०२
ब- सर्वसाधारण, विजयी उमेदवार-
कुबल प्रसन्न तुकाराम - राष्ट्रवादी * ६६५, गावकर श्रीकृष्ण गं. - शिवसेना - ४५५
तानावडे संजय महादेव -मनसे * १७५, फर्नांडीस गिरगोल सं.-रा.काँग्रेस - १४१
सारंग भुषण भगवान - अपक्ष - १६३
क-ना.मा.प्र.महिला, विजयी उमेदवार-
कर्पे पुजा राजन - राष्ट्रवादी * ७००, लोणे रोहीणी सदाशिव -रा. काँ. - २६९
हुले श्वेता सतिश - शिवसेना - ६२६
ड- सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
केळुसकर चेतना विलास-राष्ट्रवादी * ७९५, आरोलकर मंजुषा महेंद्र-रा.काँग्रेस * ३०४, गिरप गुलाबी रविद्र - शिवसेना - ४९६
प्रभाग क्र. २
एकूण मतदार- २५०५,
झालेले मतदान - १८६७
अ- सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
भागवत निला दिनकर - भाजपा * ८५२, आंगचेकर शितल ज्ञा.-रा. काँग्रेस - ७४४
बाविसकर प्रतिभा प्रविण-शिवसेना * २७१,
ब-सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
सावंत पद्मिनी जगन्नाथ-राष्ट्रवादी * ८८४, घोगळे रेश्मा रमेश - रा. काँग्रेस - ३०८
चव्हाण सई सुरेंद्र - अपक्ष * ४५६, सावंत राधा सह्याद्री - शिवसेना - २१८
क-ना. मागास प्रवर्ग, विजयी उमेदवार-
वायंगणकर रमण शंकर-अपक्ष * ७४२, कौलगेकर शाम कृष्णा - मनसे - २५६
निकम संदेश प्रभाकर-रा.काँग्रेस * ३४२, म्हापणकर चैतन्य अंकुश-भाजपा - ५२८
ड- सर्वसाधारण, विजयी उमेदवार-
गावडे शैलेश गुंडू - राष्ट्रवादी * ८४३, गावडे विक्रम विजय - रा. काँग्रेस - ३६६
परब निलेश मोहन - अपक्ष * २७, शेख अल्ताफ हमिद - शिवसेना - ११८
सापळे तुषार गजानन - अपक्ष - ५१३
प्रभाग क्र. ३
एकूण मतदार- २१३०,
झालेले मतदान - १३८१
अ-सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
कुबल नम्रता नितीन - राष्ट्रवादी * ७७८, भोसले शितल सुरेश - शिवसेना - ३४८
वेंगुर्लेकर लक्ष्मी बाबुराव- रा.काँग्रेस - २५४
ब-सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
प्रभूखानोलकर सुषमा सु. - भाजपा- ५९३, परब संचिता सुनिल - रा. काँग्रेस - २९६
परब सुस्मिता संजय - मनसे * ३०३, मोर्डेकर वृंदा कमलाकांत - शिवसेना-१८९
क-नागरिकांचा मागास प्रवर्ग,
विजयी उमेदवार- वेंगुर्लेकर अभिषेक राजीव - मनसे -५९७, किनळेकर यशवंत प्र. -रा. काँग्रेस * ३४५, साटेलकर सत्यवान विठ्ठल - राष्ट्रवादी-४३८
ड- सर्वसाधारण, विजयी उमेदवार- परब मनिष अनंत - राष्ट्रवादी * ५७५, कुबल विवेक श्रीगुरुनाथ - शिवसेना * २७९, डुबळे सुनिल शशिकांत - रा. काँग्रेस * ४०४, सातार्डेकर मनिष वामन - मनसे - १२४
प्रभाग क्र. ४
एकूण मतदार- २७६०,
झालेले मतदान - १८६६
अ- अनुसूचित जाती, विजयी उमेदवार-कांबळे वामन धोंडू - राष्ट्रवादी * ११४५, जाधव रामचंद्र कृष्णा - रा. काँग्रेस * ७२१,
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
विजयी उमेदवार-नार्वेकर अन्नपूर्ण दत्ताराम- राष्ट्रवादी -११७८, रेडकर अनुसया मुकुंद - रा. काँग्रेस -६८५
क- नागरिकांचा मागास प्रवर्ग,
विजयी उमेदवार- तांडेल सुलोचना शशिकांत-राष्ट्रवादी-१०८४, निकम सुमन संदेश - रा. काँग्रेस - ७७८
ड- सर्वसाधारण महिला,
विजयी उमेदवार-, कार्डोज फिलोमीना मॅक्सी- राष्ट्रवादी * ६२१, डिसोजा पेरपेतीन बा. -रा. काँग्रेस * ५३२, नाईक निशा नरेंद्र - शिवसेना * ५९०, शेख अलिशा जाफर - अपक्ष - १२३
इ- सर्वसाधारण, विजयी उमेदवार-परब यशवंत लक्ष्मण - रा. काँग्रेस * ६४४, आरोलकर विवेकानंद श. - शिवसेना * ४०६, येरम बुधाजी उर्फ उमेश - राष्ट्रवादी * ३६२, शेटये सचिन भगवान - अपक्ष - ४५६

लग्न - दोन कुटुंबांचे मनोमिलन

लग्न म्हणजे केवळ दोनच जीवांचं मनोमिलन नव्हे तर दोन व्यक्तींबरोबरच दोन कुटुंब एकत्र येत असतात. लग्न ठरल्यानंतर वधू-वरांकडची मंडळी तयारीला लागतात. लघीनघाई सुरु होते आणि मग ‘आता इतकेच दिवस उरले हो स्वातंत्र्याचे!‘ अशी उलटी गणना मित्रमंडळी, नातेवाईक आणि स्वतः वधु-वरांकडून केली जावू लागते.
एकीकडे लग्न ही जीवनात घडणारी अनिवार्य घटना म्हणून गृहीत धरलेली असते. मनात याबद्दल बरीच स्वप्नही असतात. पण प्रत्यक्षात यापुढे आपण आपलं संपूर्ण जीवन दुस-या व्यक्तीबरोबर भागीदारीत जगायला निघालो आहोत याची कुणाला पुरेशी जाणीव नसते तर कुणाला याबद्दल मनात एक प्रकारची भितीही वाटत असते. ही भिती ही दोन प्रकारची, एक म्हणजे या भागीदारीत आपला निभाव कसा लागेल? दुस-या व्यक्तीबरोबर सहजीवनात आपल्या व्यक्तिगत आशा, इच्छा, मत स्वातंत्र्य यांना कितीसा वाव उरेल? दुस-या व्यक्तीचा व्यवहार किती समंजसपणाचा असेल? आणि आपण प्राप्त परिस्थिती आणि आपलं मन यांचा ताळमेळ बसवू शकू का? ही दुसरी भिती स्वाभाविकरित्या जवळपास प्रत्येक वधू-वराच्या मनात येत असते.
विवाहामुळे घडणारा बदल जीवनातील व्यावहारीक गरज म्हणून आपण स्विकारत आहोत की आपल्या इच्छेनुसार मनःपूर्वक स्विकारत आहोत हाही प्रश्न सोडवणं गरजेच असतं. कारण जोपर्यंत एखादी गोष्ट भावनात्मक स्विकृतीच्या आधारे मनापासून अंगिकारली जात नाही तोपर्यंत तिच्यासाठी केलं जाणारं परिवर्तन हा नाइलाजापोटी केलेला जुलमाचा रामराम ठरतो. तसं होणं मग घातक ठरु शकतं. लग्नाद्वारे स्विकारला जाणारा संबंध हा आपल्या स्वतःच्या दीर्घकालीन उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्विकारार्ह आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मुळातच कोणताही निर्णय घेताना जीवनाच्या नेमक्या उद्दिष्टांचा बारकाईने विचार व्हायला हवा.
भौतिक उद्दिष्टे -
१) अन्नवस्त्रादी प्राथमिक गरजांची पूर्तता.
२) रहाणीमानाचा उचित स्तर गाठणे आणि टिकवणे.
३) भविष्यात हौसा भागविण्यासाठी किवा आपत्कालीक गरजांसाठी बचत
भावनात्मक उद्दिष्ट-
१) निकट प्रेमाचे संबंध (स्वतः कुणावर तरी प्रेम करणे आणि आपल्यावर प्रेम करणारे कुणी असणं.)
२) सामाजिक पातळीवर प्रतिष्ठा व प्रशंसा मिळवणे.
वैचारिक उद्दिष्टे-
१) बौद्धिक स्तरावर स्वतःच्या निरपेक्ष (द्वदद्धड्ढथ्ठ्ठद्यड्ढड्ड) अस्तित्वाचा विचार.
२) स्वतःच्या सिमीत अस्तित्वाच्या सीमांची वास्तविकता तपासून व्यक्तित्वाच्या असीमतेच्या संभावनेचा विचार.
३) असीम अस्तित्वाचा बोध होण्याच्या दिशेने प्रयास.
वरील सर्व उद्दिष्ट क्रमाने समजून घेणं गरजेचं आहे. यापैकी वैचारीक उद्दिष्टं सर्वथा व्यक्तिगत असतात. पहिल्या दोन उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता सामाजिक व पारिवारीक जीवन पद्धतीची गरज असते. म्हणजेच मुळात वैवाहिक जीवन हे पहिल्या दोन प्रकारच्या लक्ष्यांच्या प्राप्तीसाठी स्विकारलेले असते हे लक्षात ठेवायला हवं. वस्तुतः कौटुंबिक जीवनात भावनात्मक लक्ष्यप्राप्ती ही जास्त महत्वाची असते. कारण दोन मनं एकत्र येवून संसार सुरु होणार असतो.
आधी म्हटल्याप्रमाणे वैवाहीक जीवनानंतरच्या परिस्थितीबद्दल विचार करताना त्यानुसार दृष्टिकोन बदलणं जसं आवश्यक आहे त्याचप्रमाणे प्राप्त परिस्थितीचं विश्लेषण तटस्थपणे करताना चार मूलभूत मुद्यांची बैठक असायला हवी. मॅनेजमेंटच्या क्षेत्रात याला च्ज़्ग्र्च्र् ठ्ठदठ्ठथ्न्र्द्मत्द्म म्हणतात, च्ज़्ग्र्च्र् ही द्मद्यद्धड्ढदद्य, ध्र्ड्ढठ्ठत्त्दड्ढद्मद्म, ठ्ठद्रद्रदृद्धद्यद्वदत्द्यत्ड्ढद्म व द्यण्द्धड्ढठ्ठद्यद्म या चारांची आद्याक्षरे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या स्वतःच्या अंगभूत व प्राप्त परिस्थितीच्या उपलब्ध क्षमता सहाय्यक ठरतात. परिस्थिती बदलताच स्वतःच्या अंगभूत क्षमतांना वाव मिळणं वा त्यावर प्रतिबंध येणं यात त्या-त्या परिस्थितीनुसार फरक पडतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये द्मद्यद्धड्ढदढद्यण् ची बैठक बदलते. तीच स्थिती कमजोरी वा उणिवांच्या (ध्र्ड्ढठ्ठत्त्दड्ढद्मद्मड्ढद्म) बाबतीत असते. प्रत्येक परिस्थितीत प्रगतीसाठी उपलब्ध संधी (दृद्रद्रदृद्धद्यद्वदत्द्यत्ड्ढद्म) आणि उद्भवणा-या समस्या (द्यण्द्धड्ढठ्ठद्यद्म) यांचं स्वरुपही बदलतं. आता स्वतःच्या जीवनाकडे पहाताना या वैचारीक बैठकीच्या आधारे विश्लेषणाचा प्रयत्न केला तर प्राप्त परिस्थिती ही परकी न वाटता आपलीशी वाटते आणि वैवाहीक जीवनाच्या परिस्थितीबाबत परकेपण न उरणं हेच भावनात्मक पातळीवर सफल जीवनाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे.
समोरची व्यक्ती ही आपल्या स्वतःच्या आजवराच्या पूर्वसंस्कारांनी प्रभावित असल्यानं तिच्या व आपल्या विचारसरणीत अंतर असणार हे गृहीत मानायला हवं. तरीही त्याचे किवा तिचे विचार आपल्या आजवरच्या आयुष्यात तशी स्थिती आपण पाहिली नसल्याने नवे किवा वेगळे वाटत असते तरी ते चुकीचे असतीलच असं नाही! नव्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय मिळेल या विचाराबरोबरच आपण तिकडे आपल्या क्षमतांचा वापर करुन कोणती भर घालू शकू हा विचारही व्हायला हवा. जसं स्वतःच वैयक्तिक भलं करण्याचा किवा स्वतःचं स्वतंत्र व्यक्तित्व सिद्ध करण्याचा दृष्टिकोन मनाशी असतो तसाच त्यातून आपण संपूर्ण कुटुंबाच्या हितासाठी काय करु शकतो याचाही विचार हवा कारण विवाहानंतर जीवन एकट्यापुरतंच नसून कौटुंबिक सहजीवनासाठी आहे ही खूणगाठ मनाशी बांधली गेली तर सारेच सोपे होईल.
जीवनात सर्वच परिस्थिती मनाजोगी असेल असं नाही. हे जितकं खरं तितकंच ती परिस्थिती सर्वस्वी प्रतिकूल असेल असंही नाही. कोणतंही नातं केवळ भौतिक वस्तुविनिमयापुरतं नसतं. त्यात भावनात्मक संबंध महत्वाचा असतो. नाहीतर त्याला नातं म्हणताच येणार नाही, तो व्यवहार ठरेल. मानसिक आधाराची भावना नात्याला स्थायीत्व देवू शकते. समोरच्या व्यक्तीचे गुण, क्षमता, त्याचा व्यवहार या सर्वांच्या आधारे प्रत्येकामध्ये असा भावनात्मक आधाराचा संबंध जर शोधला गेला तरच ख-या अर्थाने विवाह केवळ दोघांचं मनोमिलन न ठरता दोन कुटुंबांचं मनोमिलन ठरेल यात शंकाच नाही!
- सौ. सुमेधा देसाई, तळेबाजार-देवगड,


ओळख स्वतःची
विवाहसंदर्भाने स्वतःची ओळख करुन घ्यायची तर रुप, रंग, उंची, वजन इतकीच मर्यादित न ठेवता अधिक व्यापक पातळीवर करुन घेण्याची गरज आहे. शरिर ओळखीमध्ये स्वतःचा रुप रंग... विषयी ‘आपला तो बाब्या‘ या चालीबरची ओळख नको तर वास्तव स्विकारलेली ओळख असावी. म्हणजे माझा रंग काळा असेल तर त्याला सावळा, गव्हाळ अशा वेष्टनात बांधण्याची गरज नाही. तेच नाक, डोळे, उंचीबाबत. जे जसं आहे तसं स्विकारायला हवं. आपल्याचसारखी शरिर वैशिष्ट्य असलेल्या दुस-या माणसाचं वर्णन आपण कसं करु? तसंच स्वतःचही केलं पाहिजे. म्हणजे मग ते नक्कीच वास्तव पातळीवर येतं.
यानंतर स्वतःचं शिक्षण. शालेय, महाविद्यालयीन पलिकडे जाऊन विशेष वेगळं अधिक असं काही आपण शिकलो आहोत का? आपल्याकडे काही खास कौशल्य उदा. पाककला, शिवण, संगणक, सौंदर्यशास्त्र इ. आहेत का? याचा विचार व्हायला हवा.
आपण अर्थाजनासाठी काही करत आहोत का? नोकरी, व्यवसाय. यातून आपल्याला किती अर्थप्राप्ती करता येते? हे गाव किवा ठिकाण बदललं तर त्याचे परिणाम काय होतील? आपल्या कामाचं स्वरुप कसं आहे? आपली राहण्याची जागा, परिसर, ठिकाण (शहर/गाव) यानुसार कोणत्या नविन भागात रहायला जायला जमेल? आवडेल?
आपल्या घरातील धार्मिक सामाजिक परंपरा, चालिरिती, देव, जात, धर्म याबद्दलच्या कल्पना या सगळ्या संदर्भाने स्वतःची स्वतःविषयी स्पष्ट, नेमकी मत मांडून स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
स्वतःच्या आरोग्याविषयी देखील आपल्याला नक्की माहिती हवी. किमान आपला रक्तगट, एकूण आरोग्य, आपण व्यायाम करतो का? खेळतो का? आतापर्यंत आपल्याला एखादा मोठा आजार झाला होता का? व्यंग असल्यास त्याविषयी छोट्या आजारांच्या सवयी म्हणजे डोकं दुखणं, खोकला, बारिक ताप यातलं सातत्य. आपल्या आहाराच्या सवयी आणि प्रमाण इ. सर्व गोष्टींची किमान प्राथमिक माहिती जाणीवपूर्वक आपल्याला असायला हवी.
तसचं स्वतःचा स्वभाव, वैशिष्ट्य यावरही आपल्याच घरात आपल्याला फारसा कधी विचार करावा लागलेला नसतो. पण जेव्हा घरातील माणसांव्यतिरिक्त अनोळखी व्यक्तिशी सतत सहवासात रहायचं असेल तर आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांची स्पष्ट जाणीव आपल्याला असायला हवी आणि दुस-याला न दुखावता त्यांनाही ती वैशिष्ट्यं समजायला हवी असतील तर त्याविषयीची स्पष्टता अत्यंत आवश्यक आहे. मुख्यत्वे करुन आपला राग, इतरांच्या रागावरील आपल्या प्रतिक्रिया, बोलकेपणा, आत्मकेंद्री, मित्रांची आवड, काम करण्याची आवड, विचारांची पद्धत, सकारात्मक / नकारात्मक या दृष्टीने स्वतःच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख करुन घेणं महत्त्वाच आहे.
याबरोबर ही ओळख करुन घेतांना, यावर विचार करतांना याविषयीचे मुद्दे चक्क कागदावर लिहून काढावेत, लिहितांना विचारांमध्ये अधिक स्पष्टता व नेमकेपणा येतो. लिहिलेलं इतरांना दाखवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे एकदा लिहीतांना नाही जमलं तर कागद फाडून टाकून पुन्हा नव्याने सुरुवात करता येते. यात कमीपणा, मूर्खपणा मानायचं काहीच कारण नाही. याउलट या गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने, गंमत म्हणून प्रयोग करुन तर बघू इतका स्वस्थ, स्वच्छ विचार करावा.
जोडीदार निवडताना जे आपल्यात नाही ते जोडीदारात असावं अशी अपेक्षा असते. त्यासाठी अनेक तडजोडी करायची लोकांची तयारी असते. तोच विचार आरोग्य, स्वभाव, सवयी याबाबत स्पष्ट खरं सांगून करायला हरकत नाही. उदा. मला फारसं बोलायला जमत नाही. पण घरी पाहुणे आलेले आवडतात किवा मित्रमैत्रिणी असाव्यात असं वाटतं. तस आळशी व्यक्तिला कामसू जोडीदार चालेल पण त्या व्यक्तिला आळशी जोडीदार चालणार आहे का? असे विचार करायचे तर मुख्यतः स्वतःची स्वतःला पूर्ण, स्पष्ट ओळख असणं आवश्यक आहे. तर जोडीदाराविषयीच्या स्पष्ट कल्पना आपल्याला मांडता येतील. त्याविषयीच्या अपेक्षा व्यक्त करता येतील. जेणेकरुन पुढचा जीवनप्रवास अधिक सुखकर होण्याच्या शक्यता वाढतात.
- वंदना करंबळेकर, समुपदेशक, सावंतवाडी, ९८५०४७३०१२

No comments:

Post a Comment